सातारा(अजित जगताप) : सातारा जिल्ह्यातील महसुली गावांमध्ये शासकीय योजना पोहोचवणे आणि लोकांच्या शेती व इतर दाखले आणि व्यवसायामध्ये सहकार्य करण्याची भावना सातारा जिल्ह्यातील मंडलाधिकारी व तलाठी करत असतात. आज सातारा जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या समन्वयाने बदल्या करण्यात आल्या तसेच संघटनेच्या मागणी बाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली.
सातारचे जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील, अपर जिल्हाधिकारी मलिकार्जुन माने आणि निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांचा सातारा जिल्हा तलाठी संघटनेच्या वतीने जाहीर सत्कार करून त्यांना स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन आभार मानले.
सातारा जिल्ह्यातील महसुली विभागात ६५० तलाठी मंडलाधिकारी आहेत त्यापैकी शंभर तलाठी व ३७ मंडलाधिकारी यांच्या बदल्यांबाबत चांगल्या पद्धतीने कोणाची गैरसोय होऊ नये. याची काळजी घेऊन बदली करण्यात आली. सुमोपदेश नियमाप्रमाणे झालेले या बदलीने खऱ्या अर्थाने महसूल विभागातील मंडलधिकारी ते महसूल विभागातील कारकून यांनाही न्याय मिळाला आहे. सर्वांनी झालेल्या बदलीच्या ठिकाणी हजर होऊन पुन्हा नव्या जोमाने काम करण्याची खात्री पटवून दिलेली आहे. तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. चंद्रकांत पारवे यांच्यासह संघटनेचे सुहास अभंग, (उपाध्यक्ष) प्रशांत पवार, (पुणे विभागीय उपाध्यक्ष) गणेश बोबडे, (तालुका सरचिटणीस) उमेश डोईफोडे संदीप ढाकणे शंभूराजे सपकाळ मंडल अधिकारी व तलाठी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सध्या अवकाळी पावसामुळे शेतकरी ग्रामस्थांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी महसूल विभागातील सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या योग्य मार्गदर्शन मिळत असून सातारा जिल्ह्यातील मंत्री महोदय व खासदार आमदार यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. बद्दलही तलाठी संघटनेच्या वतीने आभार मानण्यात आले.
_____________________________
फोटो — सातारा तलाठी संघटनेच्या वतीने सातारा जिल्हा अधिकारी संतोष पाटील यांचा सत्कार करताना मान्यवर (छाया– अजित जगताप सातारा)