सातारा(अजित जगताप ) : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात सात वर्षांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर याबाबत पोलीस ठाणे, न्यायालय व प्रसार माध्यम यांच्याकडे धाव घेण्यात आली. आता विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर झालेल्या आरोपापर्यंत विरोधकांनीच बदनामी जाणीवपूर्वक केल्याचा कट रचल्याचा गोप्य स्फोट केला. त्यानंतर त्यांनी सभागृहाला माहिती दिली. ही माहिती अर्धवट असून मंत्री गोरे प्रकरणातील पूर्णसत्य केव्हा समजणार ? याबाबत दोषींवर कारवाई होणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांना २०१६ पासून जाणीवपूर्वक अडकवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षाचा मोठा हात होता. या
प्रकरणात सुप्रिया सुळे आणि रोहितपवार हे आरोपी युट्युब चॅनेल चालवणारे तुषार खरात याच्या संपर्कात होते. या प्रकरणाविरोधात जे व्हिडीओ तयार केले गेले, ते आधी खासदार सुप्रिया सुळे आणि
आमदार रोहित पवार यांना पाठवण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केला.
मंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात षडयंत्र रचले गेले आणि त्यांना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला.
मंत्री जयकुमार जयकुमार गोरे याचे प्रकरण नऊ वर्षांपूर्वीची आहे . त्यावेळी माणचे आमदार जयकुमार गोरे हे काँग्रेसमध्ये होते. भारतीय जनता पक्षाशी त्यांचा संबंध नव्हता.या प्रकरणात न्यायालयाने २०१९ साली त्यांना क्लीनचीट दिली. तरी राजकीय विरोधकांनी व तक्रारदार महिलेने मंत्री गोरे विरोधात षडयंत्र रचून त्यांना गोवण्याचा प्रयत्न केला. राजकारण करावे आणि ते सगळेच करतात. परंतु एखाद्याची वैयक्तिक आणि कुटुंबाची बदनामी
होईल आणि एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त होईल, असे राजकारण करू नये, असा सल्ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी राजकीय विरोधकांना दिला. हे जरी खरे असले तरी हे पूर्ण सत्य आहे का? याची पडताळणी का केली नाही ? ॲट्रॉसिटी ॲक्ट दाखल होऊन आरोपींना अटक करण्यास एवढा विलंब का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणांमध्ये तक्रारदार महिला व पत्रकार एवढेच दोषी असतील? तर त्यांना सहकार्य करणारी तपास यंत्रणा, पुरावे सादर करणारी यंत्रणा यांना कोणती शिक्षा झालेली नाही किंवा त्यांच्या बाबत साधी चौकशी सुद्धा केली जात नाही.
दुसऱ्या बाजूला विचार केला तर न्यायप्रविष्ठ बाब असताना सुद्धा सत्तेचा वापर करून जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि काही प्रसारमाध्यम यांना निवेदन देणे . मंत्री गोरे यांना बदनाम व दोष मुक्त ठरवण्याची मानसिकता तयार करण्यासाठी समाज माध्यमाचा वापर करणे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलणे टाळले आहे.
राजकारणामध्ये काही अपवाद वगळता धुतल्या तांदळासारखे कोणी नसते. उलट शंभर अपराधी सुटले तरी चालेल पण एका निरापराद्याला शिक्षा होऊ नये. अशी न्यायालयीन व्यवस्था आहे. त्याचा आदर राखणे सर्वांच्याच कर्तव्य आहे. मंत्री गोरे प्रकरणातील सदर महिलेची बाजू मांडण्यासाठी जे वकील त्या महिलेने नेमले. त्यांच्याच कार्यालयात पक्ष घेताना घडलेला प्रकार व सातारा जिल्ह्यातील काँग्रेस सारख्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी मिटवामिटवीची भाषा करतो. चित्रीकरण केले जाते आणि ते राष्ट्रीय बातमी सारखे प्रसारमाध्यमापर्यंत प्रसारित होत आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी का मौन पाळले ? हा सुद्धा सामान्य माणसाला प्रश्न पडला आहे.
महायुतीच्या मंत्र्यांना सहकार्य करणाऱ्या काँग्रेसच्या त्या कार्यकर्त्याला विधान परिषदेवर संधी देण्यास भाजप पुढाकार घेणार का? असाही सवाल आता उपस्थित केला जात आहे.
याप्रकरणी न्यायालयाने सर्व डाटा डिलीट करण्याचे आदेश दिले का ? याची माहिती काहींच्या निवेदनात दिसून येत नाही. याप्रकरणी निवेदनात काही आरोपी पिंजऱ्यात उभे केले आहे. पण त्यांना शिक्षा होणार का? हाच मुख्य प्रश्न आहे.
मंत्री जयकुमार गोरे व त्यांच्या समर्थकांना वास्तविक पाहता या सर्व प्रकरणाची जाणीव होती. म्हणूनच त्यांनी तीन कोटीची मागणी पूर्ण करून सदर महिलेला एक कोटी रुपये घेताना पोलिसांच्या ताब्यात दिलेले आहे. सदर महिला या प्रकरणात एकटी नसावी. मुखवटे मागचे चेहरे बाहेर पडणे गरजेचे आहे. हा व्यक्तिगत कुणावर आरोप प्रत्यारोप नसून अर्धसत्य जे आहे. ते पूर्ण सत्य जनतेला समजावं अन्यथा सत्तेचा वापर करून एखाद्याची बदनामी होत असेल तर तेही चुकीचे आहे. आणि पराचा कवळा करून आपलं हित सिद्ध करणे. हे त्यापेक्षाही महाभयंकर आहे. असे अनेकांना वाटत आहे .
त्यामुळे पूर्ण सत्य केव्हा बाहेर पडणार? शेवटी दैनिक सामना चित्रपटातील मारुती कांबळे चे काय झाले ? हे आजही लोकांचा प्रश्न कायम आहे हे मात्र खरे… या प्रकरणाबाबतही पूर्ण सत्य समजणे गरजेचे आहे. अन्यथा ते रहस्यच राहील. अशी शंका कर्त्यांना वाटत आहे.
__________________________________
चौकट___ एरवी पत्रकारिता कशी करावी. त्यासाठी काही रिकामटेकडे व तत्त्वज्ञान सांगणारे अनेक भुरटे या प्रकरणाबाबत आपले मत व्यक्त करण्यासाठी सार्वजनिक रित्या पुढे येत नाही. त्यांनी कुवेतीत राहून प्रश्न उपस्थित करू नये. अशी चर्चा आता चांगलीच रंगू लागलेली आहे.
————————————-
चौकट – साताऱ्यात सदर महिलेला एक कोटी रुपये खंडणी म्हणून देण्यासाठी जी रक्कम गोळा केलेली आहे. अशा दानशूर व्यक्तींचे नाव लपवण्यामध्ये कोणत्या समाजात आहे याचा खुलासा करावा अशी मागणी अजित निकम, अरुण पवार यांनी केली आहे.