प्रतिनिधी : जयहिंद सैनिक संस्था आणि शिक्षक लोकशाही आघाडी (TDF) मुंबई यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विचार देशातील शाळा कॉलेजमधील मुलापर्यंत पोहोचावे या मागणीसाठी राज्यपालांचा सह मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री,उच्चशिक्षण मंत्री यांना पत्र व्यवहार केला होता. त्यानुसार २३ जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असल्याने त्या अगोदर त्यांनी केलेली मागणी प्रत्येक शाळा कॉलेजमधील मुलापर्यंत नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे विचार पोहोचावे या मागणीला सरकारने निर्देश जारी केले आहेत.
त्यांच्या इतर मागण्या पुढीलप्रमाणे नेताजींची आझाद हिंद सेना स्मरणार्थ १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी प्रमाणे दरवर्षी २१ ऑक्टोबर रोजी ६० हजार आजाद हिंद सेना आणि २६ हजार शहीद सैनिकांना लाल किल्ल्यावरून तसेच देशाच्या राज्याच्या कानाकोपऱ्यातून तिरंगा ध्वज फडकून आदरांजली वाहण्यात यावी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची देशभक्ती संघर्षमय कार्य आणि क्रांतिकारी विचार देशातील सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये शिकवले जावेत, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २३ जानेवारीला सरकारी सुट्टी देऊन १६ ते ३१ जानेवारी दरम्यान देशभरात सुभाष जयंती पंधरवडा साजरा करण्यात यावा.
अशा मागण्या जयहिंद सैनिक संस्था व शिक्षक लोकशाही आघाडी यांच्यातर्फे करण्यात आली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रीय अध्यक्ष पंजाबराव मुधाने, राष्ट्रीय महासचिव जनार्दन जंगल, राष्ट्रीय सचिव सुरेंद्रकुमार मिश्रा, संघटक प्रेमशंकर गुप्ता, संपर्कप्रमुख दीपक कांबळे सुनील वडपतकर व महिला ब्रिगेड अध्यक्ष मधुबाला जंगले या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे क्रांतिकारी विचार देशातील शाळा कॉलेज मध्ये पोहचणार ; जयहिंद सैनिक संस्थेच्या मागणीला यश
RELATED ARTICLES