ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

मलेशिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय तायक्वादो स्पर्धेत भारताचा तिरंगा फडकला; जयेश ट्रेनिंग तायक्वांदो अकॅडमीच्या खेळाडूंचे दमदार प्रदर्शन

मुंबई (शांताराम गुडेकर ) मलेशिया मधील कौलालंपर या शहरात दिनांक २९ जुलै ते २ ऑगस्ट २०२४ च्या ६ वी हिरोस कप मलेशिया आंतरराष्ट्रीय पुमसे आणि क्युरोगी स्पर्धेत मुंबईतील जयेश ट्रेनिंग तायक्वादो अकॅडमीच्या खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करत ४ सुवर्ण , ४ कांस्य आणि ५ रौप्य पदके जिंकली.अकॅडमीच्या या खेळाडूंच्या कामगिरीमुळे मलेशियात भारताचा तिरंगा डौलात फडकला. या आंतरराष्ट्रीय तायक्वादो स्पर्धेत जगभरातून १५ ते २० देशांच्या जवळजवळ तीन हजार खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.या संघात तनिष्का वेल्हाळ, आर्या चव्हाण,आरव चव्हाण आणि सिनीअर वयोगटात विनीत सावंत,स्वप्निल शिंदे,यश दळवी यांचा समावेश होता.जयेश ट्रेनिंग तायक्वांदो अकादमीचे प्रमुख प्रशिक्षक जयेश वेल्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी पदकांची कमाई केली. या स्पर्धेसाठी गेले ३ ते ४ महिने जयेश ट्रेनिंग तायक्वांदो अकादमीच्या जुहू विभागातील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षक यश दळवी, विक्रांत देसाई, स्वप्निल शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली सराव चालू होता.

Scroll to Top