ताज्या बातम्या

गांधी जयंती व लाल बहादुर शास्त्री जयंतीनिमित्त शांती मार्च

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त उद्या गुरुवार, दि. २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता फोर्ट येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मंत्रालय जवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत शांती मार्चचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली आहे.

लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी हा शांती मार्च काढण्यात येणार आहे. या शांती मार्चमध्ये महाविकास आघाडी, जनसुरक्षा कायदा विरोधी संघर्ष समिती आणि सामाजिक संस्था, संघटना व इतर समविचारी पक्ष, संघटना यांचे सदस्य व पदाधिकारी सहभागी होणार आहेत असेही राजहंस म्हणाले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top