ताज्या बातम्या
परिवहन विभाग १ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविणार;अमराठी चालकांना मराठीचे धडेही देणार — परिवहन मंत्री प्रताप सरनाईकझांस्कर ( लडाख) येथे पहिले जिल्हाधिकारी होण्याचा मान दहिवडीच्या ओंकार राजेंद्र गुंडगे यांना …शरद प्रतिभाषाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या मुंबई अध्यक्षपदी हास्य अभिनेते अरुण कदम यांची नियुक्तीनोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालये आता खासगी संस्थांकडून चालविली जाणार; नव्या ६० केंद्रांना मंजुरी ग्राहकांना अतिरिक्त सेवाभार म्हणून सुमारे ५,२०० रुपये मोजावे लागणारचिराग नगर रस्ता कामातील निकृष्ट वॉटर टेबल हटवले; सोशल मीडियावरील आवाजानंतर पालिकेची दखल

आवाज जनतेचा, लढा आपल्या मुंबईचा!” – धारावी पुनर्वसन आणि मुलुंड पीएपी प्रकल्पाविरोधात जनतेचा प्रबळ आवाज

मुलुंड : शिवसेना (उबाठा) वतीने सोमवारी कालिदास सभागृह, मुलुंड येथे ‘लढा आपल्या मुंबईचा’ या अभियानांतर्गत एक महत्त्वपूर्ण जनआंदोलन उभं राहिलं. उद्धव बाळासाहेब शिवसेना पक्षाचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली धारावी पुनर्वसन आणि मुलुंड पीएपी प्रकल्पाविरोधात सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करण्यात आली.

या आंदोलनात ईशान्य मुंबईतील हजारो प्रकल्पग्रस्त नागरिकांनी सहभाग घेतला. आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली की, “धारावीचा पुनर्विकास हा धारावीतच झाला पाहिजे आणि विकास हा अदानीचा नव्हे तर जनतेचा असावा.” तसेच त्यांनी केंद्र सरकारकडून अदानी समूहास देण्यात आलेल्या कथित मंजुरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

मुलुंडकरांनी यापूर्वी ‘मुलुंड बचाव’ आंदोलनाच्या माध्यमातून प्रकल्पाविरोधात आवाज उठवला होता. मात्र सरकारकडून केवळ आश्वासने मिळाली आणि प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून आली. या प्रकल्पामुळे मुलुंड, भांडूप, कांजूरमार्ग या भागांतील नागरिकांना अधिक दाटीवाटी व विविध समस्यांना सामोरे जावे लागणार आहे, अशी चिंता व्यक्त करण्यात आली.

हा लढा केवळ धारावी किंवा मुलुंडचा नसून तो संपूर्ण मुंबईकरांचा असल्याचा संदेश या आंदोलनातून दिला गेला. उपस्थितीवरून नागरिकांचा सरकारच्या धोरणांवरचा रोष स्पष्ट दिसून आला.

Scroll to Top