
प्रतिनिधी : बेळणे खुर्द खालची वाडी येथील श्री पावणादेवी ग्रा.वि. मुंबई मंडळाचा २५ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दोन दिवसांच्या या कार्यक्रमात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, गावातील ज्येष्ठ नागरिकांचा व मंडळातील माजी सभासदांचा सत्कार करण्यात आला तसेच कै.चंद्रकांत सदाशिव चाळके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चंद्रकांत चाळके प्रतिष्ठान भांडुप संस्थेच्या वतीने गावातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. गेले २५ वर्ष श्री पावणादेवी ग्रा.वि. मुंबई मंडळ बेळणे खुर्द (खालची वाडी) यांच्या माध्यमातून गावातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच गावाच्या विकासासाठी सतत अनेक उपक्रम राबविले जातात.