सातारा(अजित जगताप) : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा शहरात उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच मुस्लिम बांधवांच्या खिदमत ए खल्क संघटनेतर्फे गरिबांसाठी पाणपोई बसविण्यात आले आहे. यामुळे माणुसकीच्या गारवा निर्माण करण्यास मदत झाल्याची भावना सर्व जाती धर्मातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
माणुसकीसाठी सदैव तत्पर हया ब्रीदवाक्यानुसार खिदमत ए खल्क संघटना काम करत आहे. एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त शोषित, कष्टकरी, शेतमजूर व कामगारांना थंड पाणी उपलब्ध करण्याची भूमिका घेऊन जय… जय.. जय महाराष्ट्र माझा…. गर्जे महाराष्ट्र माझा… हे वाक्य तंतोतंत पाळले आहे.
मुहम्मद पैगंबर आणि छत्रपती शिवाजी महाराज,सम्राट शाहूंच्या शिकवणीनुसार खिदमत ए खल्कने छत्रपतींच्या वारसांचा मानसन्मान ठेवताना सामान्य माणसांच्या ही अपेक्षा पूर्ण करण्याची भूमिका घेतली आहे. तसेच महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रीयन बांधवांना मिठाईवाटप करून आनंद उत्सव साजरा केला. सर्व जाती धर्माच्या मराठी भाषिकांच्या हा आनंदाचा सोहळा म्हणून त्यांनी मिठाई वाटली आहे. कोणत्याही इतर धर्माचा द्वेष करू नये. अशी शिकवण जतन करून ठेवली आहे. कारण पाणी हे सर्व जाती धर्मासाठी आवश्यक आहे. त्याचे वाटप करून खऱ्या अर्थाने समतेचा नारा दिला आहे. सतत एखाद्या गोष्टीवरून जातीय द्वेष पसरवण्यासाठी एखादा मुद्दा घेणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकले आहे. अशी प्रतिक्रिया सर्वधर्मीय सामाजिक कार्यकर्त्याकडून उमटत आहे.
खिदमत ए खल्कचे अध्यक्ष सादिकभाई शेख यांच्या उपस्थितीत सातारा शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी शिवजल पाणपोईचे उद्घाघाटन श्री संग्राम बर्गे, पोलिस निरीक्षक पाटोळे , हाजी सिराज मुल्ला, अरुण राजेभोसले, अझर भाई मणेर व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले . या कार्यक्रमात गोरगरिबांनी थंड पाणी पिऊन आपले तहान भागवली. बॉम्बे रेस्टॉरंट चौक, पोवई नाका, शनिवार चौक ५०१ पाटी येथे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील कणा असलेले लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि शाहीर अमर शेख तसेच स्वातंत्र्य सैनिक कॉम्रेड वसंतराव आंबेकर यांच्या स्मृतीस स्मरण करत शाहीर फरांदे यांचे पुत्र शाहीर वैभव फरांदे व निर्भीड पत्रकार व लोकवृत्तचे संपादक सुजित आंबेकर गेंडामाळ कब्रस्थानचे चेअरमन साजिदभाई शेख हाजी सल्लाउद्दीन बागवान , रफिक शेख, प्रगती जाधव- पाटील , रेणू येळगावकर , शैलेंद्र पाटील ,प्रकाश फरांदे यांच्या उपस्थितीत पार पडले.
शिवजल पाणपोई कार्यक्रमाला सातारा शहरातील सामाजिक कार्यकर्ते पंकज नागोरी, चंद्रशेखर घोडके, रवींद्र भैय्या ढोणे ,गणेश नलावडे , इम्तियाज सय्यद ,इंटेखाब बागवान आणि
खिदमत ए खल्क तर्फे आसिफ खान ,अरिफ खान ,मुबीन महाडवाले,अब्दुल सुतार ,साकिब बागवान ,हाफिज मुराद ,असिफ फरास ,अबिद बागवान ,आफताब शेख ,ऍड अमजद खान, डॉ फैय्याज शिकलगार ,शारिक बागवान ,शाहरुख पठाण, राजू मुस्तफा, सलिम भारत व इतरांनी परिश्रम घेतले. त्यांना विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी धन्यवाद दिले आहेत.
______________________________
फोटो– साताऱ्यात खिदमत ए खल्क संघटनेतर्फे पाणपोईचे उद्घाघाटन (छाया— अजित जगताप सातारा)