ताज्या बातम्या
धारावीकरांना ५००, चाळी-इमारतीतील रहिवाशांना १,००० चौ. फुटांची घरे द्या ; मास्टर प्लॅन व पुनर्वसनाची कायदेशीर हमी मिळेपर्यंत करार न करण्याचे आवाहन‘वाजवा शाळेचा गजर, नको रे बाबा पुन्हा गेट टू गेदर!’ जुन्या आठवणी, मैत्री आणि नातेसंबंधांचा वास्तववादी वेध; आवर्जून पाहावे असे नाटकखारघर हिल महापौर मॅरेथॉन’ स्पर्धेत आयुक्त डॉ. शिंदे यांची यशस्वी धावगणेशोत्सवाच्या उत्साहाला गालबोट! २२ फुटी ‘भुलेश्वरचा राजा’ अचानक कोसळला; २ जणांचा मृत्यू, ५ जखमी”व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

विधानसभेत १४ जागा रिक्त; सात आमदार राजीनामा देणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने विधानसभेतील सात आमदार आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. यापूर्वी दोन आमदारांनी दिलेला राजीनामा व चार आमदारांचे निधन यामुळे विधानसभेच्या सध्या चौदा जागा रिक्त होतील.

विधानसभा सदस्य असलेले प्रणिती शिंदे, बळवंत वानखडे, रवींद्र वायकर, निलेश लंके, वर्षा गायकवाड, संदीपान भुमरे, प्रतिभा धानोरकर हे आमदार लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यामुळे हे सदस्य आमदारकीचा राजीनामा देतील. यातील काहींनी राजीनामा दिल्याचंही समजतंय. तर, यापूर्वी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण व राजू पारवे यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये तर राजू पारवे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. गोवर्धन शर्मा, राजेंद्र पटणी, अनिल बाबर व पी. एन. पाटील यांचे निधन झाल्याने चार जागा रिक्त आहेत. तर काँग्रेसचे सुनील केदार अपात्र झाल्यामुळे त्यांची जागाही रिक्त आहे.

Scroll to Top