ताज्या बातम्या
धारावीकरांना ५००, चाळी-इमारतीतील रहिवाशांना १,००० चौ. फुटांची घरे द्या ; मास्टर प्लॅन व पुनर्वसनाची कायदेशीर हमी मिळेपर्यंत करार न करण्याचे आवाहन‘वाजवा शाळेचा गजर, नको रे बाबा पुन्हा गेट टू गेदर!’ जुन्या आठवणी, मैत्री आणि नातेसंबंधांचा वास्तववादी वेध; आवर्जून पाहावे असे नाटकखारघर हिल महापौर मॅरेथॉन’ स्पर्धेत आयुक्त डॉ. शिंदे यांची यशस्वी धावगणेशोत्सवाच्या उत्साहाला गालबोट! २२ फुटी ‘भुलेश्वरचा राजा’ अचानक कोसळला; २ जणांचा मृत्यू, ५ जखमी”व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

अस्मानी संकटात शेतकऱ्यांना मनसेच्या स्नेहल जाधव यांचेकडून पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे एक लाखाची मदत

प्रतिनिधी : अस्मानी संकटामुळे पुराच्या पाण्यात हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना “फुल ना फुलांची पाकळी” म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. मनसेच्या सरचिटणीस सौ. स्नेहल सुधीर जाधव यांनी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडे एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्त केला.

शेतकऱ्यांवर ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर मनसेने “म- मदत, न- नव्हे, से- सेवा” या भावनेतून ही मदत दिली असल्याचे जाधव यांनी सांगितले. “जगाचा पोशिंदा जगला तर आपले अस्तित्व टिकेल” या विचाराने प्रेरित होऊन ही कृती करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यभरातील शेतकरी मोठ्या संकटातून जात असताना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पाठीशी उभी राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Scroll to Top