ताज्या बातम्या
महायुतीत फूट पाडण्याचे प्रयत्न निष्फळ; ‘पुढे काय घडतंय ते पाहा’ – एकनाथ शिंदे यांचे सूचक वक्तव्य“माझ्या नेतृत्वावर विश्वास नसेल तर मी पक्षप्रमुखपद सोडायला तयार” : शिवसेनेच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंची भावनिक सादबेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहनधारावीकरांमध्ये पुनर्वसनाबाबत संभ्रम व असुरक्षिततेची भावना, विशेष बैठक आयोजित करून स्पष्ट धोरण व लेखी हमी द्यावी – खासदार वर्षा गायकवाड यांचे cm/dcm यांना पत्रRTE च्या नावाखाली पालकांची लूट? घणसोलीतील न्यू बॉम्बे सिटी स्कूलवर गंभीर आरोप; १ हजारांचा फॉर्म, १३,६०० रुपयांची ‘अँक्टिव्हिटी फी’ अनिवार्य?

दोन सख्ख्या भावाचा विहिरीत पडून मृत्यू

प्रतिनिधी : पैठण तालुक्यातील आडुळ येथे आज दुपारी २ शाळकरी सख्ख्या भावांचा विहिरीत पडून मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. जय कृष्णा फणसे (१०) व प्रणव कृष्णा फणसे (६) अशी मृत मुलांची नावे आहेत.
आडुळ येथील चौथीमध्ये शिकत असलेला जय फणसे आणि पहिलीमध्ये शिकत असलेला प्रणव फणसे हे २ सख्खे भाऊ आपल्या आईसोबत जमवाडी परिसरातील रजापूर शिवारातील विहिरीवर गेले होते. यावेळी कठडे नसलेल्या विहिरीमध्ये दोघे पडून त्यांचा मृत्यू झाला.
पाचोड पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने एका मुलाचा मृतदेह बाहेर काढला. मात्र दुसऱ्याचा मृतदेह सापडला नसल्याने छत्रपती संभाजीनगर येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर जवानाच्या मदतीने तीन वाजताच्या दरम्यान त्याचाही मृतदेह पाण्याबाहेर काढला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे

Scroll to Top